सुख़समाधानासाठी, आनंदासाठी आपण
प्रपंचाचा अंगिकार करतो. पण अशा व्यवहारातुन
मिळणारे सुख क्षणभंगुर असते. कदाचित या क्षणभंगुर
आनंदापासुन अनंतकोटी समाधान साधण्यासाठी
अध्यात्माची गरज या कलियुगात आहे. अशी प्रपंच व
अध्यात्माची सांगड केवळ संत सत्पुरूषच घालु शकतात.
ज्या प्रकारे संत अरण्यात, डोंगरात, कडेकपारीत
राहुन, तप करून परमेश्वर प्राप्त करून घेतात, त्या
प्रमाणे साधना उपासना, जप तप अथवा व्रत हे असे
एकांत वनश्रींच्या, पशु पक्षांच्या सानिध्यात
राहुन केल्यास परमेश्वर प्राप्त करून घेता येतो.
..................... |